पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी, १३ एप्रिल २०१९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, नवी दिल्ली येथे होणाऱ्या २१ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया व सहाव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष प्रा. अरुण आंधळे यांचा सत्कार आणि कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘काळी आई’ काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन असा ‘त्रिवेणी संगम’कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी साडे दहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते सत्कार व प्रकाशन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे असणार आहेत. उद्योजक प्रा. विनोद गलांडे पाटील यांची या वेळी विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे व बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत रोकडे यांनी दिली.
कार्यक्रमाविषयी : पुस्तक प्रकाशन व सत्कार
स्थळ : माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद.
दिवस व वेळ : शनिवारी, १३ एप्रिल, सकाळी साडे दहा वाजता.