Ad will apear here
Next
बंधुता साहित्य परिषदेतर्फे शनिवारी ‘त्रिवेणी संगम’
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी, १३ एप्रिल २०१९ रोजी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, नवी दिल्ली येथे होणाऱ्या २१ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया व सहाव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष प्रा. अरुण आंधळे यांचा सत्कार आणि कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘काळी आई’ काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन असा ‘त्रिवेणी संगम’कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

सकाळी साडे दहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते सत्कार व प्रकाशन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे असणार आहेत. उद्योजक प्रा. विनोद गलांडे पाटील यांची या वेळी विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे व बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत रोकडे यांनी दिली.

कार्यक्रमाविषयी : पुस्तक प्रकाशन व सत्कार 
स्थळ : माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद.
दिवस व वेळ : शनिवारी, १३ एप्रिल, सकाळी साडे दहा वाजता.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZVABZ
Similar Posts
डॉ. वसंतराव पटवर्धनांचा ‘मसाप’तर्फे सत्कार पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष, अर्थतज्ज्ञ, उत्तम लेखक, कवी, संस्कृतचे गाढे अभ्यासक असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. वसंतराव पटवर्धन मंगळवारी, २४ एप्रिल रोजी नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त शनिवारी, २१ एप्रिल रोजी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज पुणे : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. गेली ११० वर्षे मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या या संस्थेचा १११वा वर्धापनदिन २६ आणि २७ मे रोजी साजरा होणार आहे. २६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ग्रंथ आणि
‘संगीतामुळे दृष्टी सौंदर्यमयी होते’ पुणे : ‘माणूस सर्व कला शिकतो तेव्हा त्याला सौंदर्यदृष्टी येते; पण संगीत शिकतो तेव्हा दृष्टीच सौंदर्यमयी होते. नाटक हे करणाऱ्याच्या मनात असावे लागते. ते नसेल तर नाटकातील गाणे सुरेल होऊ शकत नाही. कारण, नाटकात गाणे हे सोपे काम नाही. संगीत नाटकातले गद्यही सुरात म्हणावे लागते. सूर असतील तरच नाटक यशस्वी होते,’
डॉ. गाडगीळ सात ऑगस्टला ‘मसाप गप्पा’मध्ये पुणे : आपल्या सोप्या आणि सहजसुंदर शैलीतून विज्ञानविषयक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सात ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language